मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच मुख्यमंत्री व्हायला आवडणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं होते. तसेच हे सरकार आमच्या भरोश्यावर,आम्ही सरकारच्या नाही? पुन्हा एकदा नाना पटोले यांनी ट्टिट करत सरकार निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू असतानाच, काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी ट्टिट करत या चर्चेला उजाळा दिली आहे. नाना पटोले म्हणाले की सरकार आमच्या भरोश्यावर; आम्ही सरकारच्या नाही? तसेच मुख्यमंत्री व्हायला आवडणार असल्याचे नाना पटोले यांनी आपली इच्छा व्यक्त करुन दाखवली आहे.
महाराष्ट्र की सरकार हमारे भरोसे है, हम सरकार के भरोसे नहीं हैं – @NANA_PATOLEpic.twitter.com/F6lTbrW3Pu
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 14, 2021
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाबाबतची महत्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली असेल तर स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाल महत्वाकांक्षा असते. पण शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून जे व्यक्ती आहेत. ते निर्णय घेत असतात. आता कोणत्या पक्षाशी आघाडी करायची की स्वबळावर लढायचं हा अधिकारा काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना आहे. राष्ट्रवादीत शरद पवार आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे आम्ही यावर मत व्यक्त करणं योग्य नाही”, कोल्हापूर दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी आपली रोखठोक भुमिका मांडली होती.