मुंबई : विरोधकांचं व्हिजन सरकार गेल्याने धूसर झालं आहे. आमचं व्हिजन साफ आहे. आम्ही लोकांची सेवा करणार, जनहिताची कामं करणार, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. विरोधकांच्या डोक्यात सतत सरकार अस्थिर करण्याचा विचार असतो. सतत निवडणूक लागावी असा त्यांचा विचार आहे.
सरकारवर आरोप करुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र लोकांचा विश्वास महाराष्ट्र सरकारवर वाढत आहे, हे विरोधकांनी पाहिलं पाहिजे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणं हे माझं काम नाही. लोकांना मदत करणे, त्यांच्या हिताची कामं करणे ही माझी जबाबदारी आहे, असं ते म्हणाले.
डोंबिवलीच्या प्रदूषणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, डोंबिवली माझं आवडतं शहर आहे. सत्तांतर झाल्यानंतर डोंबिवलीचे रस्ते आम्ही सुधारण्यास सुरुवात करत इतर विकासकामंही हाती घेतली आहेत. डोंबिंवली किंवा इतर काही शहरांमधील प्रदूषणांचा विषय आम्ही हाती घेतला आहे. येत्या दोन-तीन वर्षात कायदेशीररित्या पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या कंपन्या शहराबाहेर नेण्याबाबत विचार केला जाईल, असंही त्यांनी आश्वासन दिलं.
Read Also :
सूडाच्या मार्गाने जाण्यास आम्हाला भाग पाडू नका, मुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देहविक्री करणाऱ्या महिलांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा
“जनतेचं बहुमत नसतानाही…,” पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका
“सर्वोच्च आणि उच्च न्यायालयालासुद्धा ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?,” फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल