करोनाचा संसर्ग आणि उपचारांदरम्यान वेळेत अँम्ब्युलन्स उपलब्ध होऊ न शकल्याने पुण्यात पत्रकार पाडुंरंग रायकर यांचा मृत्यू झाला.त्यानंतर पत्रकारांनी सुविधेच्या नावाखाली फक्त उदघाटन करणाऱ्या सरकारला जाब विचारायला सुरुवात केल्यानंतर आता विरोधी पक्षात असलेल्या भाजपकडून देखील या प्रकरणाबाबत सरकारला जाब विचारायला सुरुवात झाली आहे.
एक होतकरू पत्रकार आज दुर्दैवाने मृत्युमुखी पडला आहे आणि आता त्यांचे निधन झाल्यानंतर चौकशी करून काय उपयोग ? असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला लगावला आहे.
पुण्याला मुख्यमंत्री येऊन गेले. तेथे कोविड सेंटर व आरोग्य व्यवस्था उभी केली, पण त्याला जर आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसेल तर त्याचा काय उपयोग ? सरकारच्या अव्यवस्थेमुळे पांडुरंग रायकर यांचा नाहक बळी गेला असल्याचा आरोप देखील दरेकर यांनी यावेळी सरकारवर केला.
रायकर यांना उपचारासाठी वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही व बेडही मिळाला नाही. पत्रकाराच्या मृत्यूला यंत्रणेतील अव्यवस्था व महाविकास आघाडीचे सरकारच जबाबदार असल्याचे सांगत दरेकर यांनी यावेळी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
Read Also This
किरीट सोमय्या यांच्या ‘भो. . भो ‘मध्ये काहीच तथ्य नाहीhttps://t.co/f4JwFN3HC3@KishoriPednekar @ShivsenaComms
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 2, 2020