मुंबई: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युतीचे संकेत दिले होते. यावरून भाजपने शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी युतीची आँफर धुडकावून लावत एमआयएमवर जोरदार टीका केली. आता याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा सर्व मुस्लीम समाज शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना आदर्श मानतो. त्यांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे विसरून जा. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी करता. औरंगजेब कोणत्या काळात होते आणि आजचा काळ काय आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं.
तर महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार असून यात चौथा, पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडता. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श असून एखाद्या पक्षाचे नेते औरंगाबादजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एमआयएमनं राष्ट्रवादीला दिलेल्या युतीच्या ऑफरवरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला. ते म्हणाले की, आम्ही पाहत आहोत की ते सत्तेसाठी काय करणार आहेत. तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. अजानची स्पर्धा वैगरे सुरू आहे. त्याचा परिणाम आहे का पाहूयात. एमआयएम जर महाविकास आघाडीसोबत जात असेल तर आम्हाला काही फरकत पडत नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.