कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात बनावट मास्क आणि सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. याशिवाय मागणीत वाढ झाल्याने कंपन्या अधिक दर आकारात आहेत. कोरोना व्हायरसच्या काळात आवश्यक असलेल्या या वस्तूंच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. राज्य सरकार मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांशी चर्चा करून येत्या ७ ते ८ दिवसात याबाबतचा आदेश काढला जाईल, असे राजेश टोपे यांनी दिली आहे.
सध्या बाहेर फिरताना मास्क वापरणे आवश्यक असून, मास्कचा वापर न केल्यास कारवाई केली जात आहे. त्यामुळे मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मास्क उत्पादन करणार्या कंपन्यांनी मास्कची किंमत खूप वााढवली असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या दरावर नियंत्रण आणण्याचं ठरवलं आहे.