मुंबई : राज्य सरकाराने न्यायालयात दाखल केलेली ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका न्यायलयाने रद्द केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला दुसरा धक्का बसला आहे. यावरून आता ओबीसी समाज आणि विरोधकांनी ठाकरे सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. सरकारच्या नाकार्तेपणामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला, ओबीसी समाजाचे राजकीय भवितव्य धोक्यात आहे, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला ठाकरे सरकारच जबाबदार आहे, आमचे राजकीय आरक्षण तुम्ही का टिकवले नाही?, असा प्रश्न भाजपचे आमदार तथा माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी ठाकरे सरकारला केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाअंतर्गत राखीव जागांच्यासंदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे अखेर ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने अजीबात गांभीर्य दाखविले नाही असे बोंडे यांनी बोलतांना सांगितले.
पुन्हा महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजासोबत धोका केला.#ओबीसीआरक्षण pic.twitter.com/ahE6hz0bra
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) May 29, 2021
मराठ्यांना राजकीय पटलावर मोठे होऊ द्यायचे नव्हते, त्यामुळे ठाकरे सरकारने त्यांचे आरक्षण टिकवले नाही. आता त्यांच्या पाठोपाठ ओबीसी समाजाला देखिल राजकीय पटलापासून वंचित ठेवले आहे. सरकारने जाणिवपुर्व हा कट रचला आहे. मागासवर्गाचा अहवाल बरोबर होता. परंतू ठाकरे सरकारला ओबीसी समाजाची बाजू मांडता आली नाही. ओबीसी समाजाला मी आव्हान करतो की ठाकरे सरकारला जाब विचारा?, आमचे आरक्षण का टिकवले नाही?, याचे उत्तर विचारा, असे बोंडे यांनी आवाहन केला आहे. त्यांनी ट्विटरवरील व्हिडीओच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे.