राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज शहा आणि शरद पवार यांच्या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात असलेली महाविकास आघाडी मजबूत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची घडी शरद पवार यांनी बसवली आहे. ती मोट अभेद्य राहणार आहे, इतर कोणत्याही वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. रां नी
भाजपचे नेते अमित शहा यांनी पण या भेटीवर वक्तव्य केले होते. त्या विधानामुळे सगळ्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली होती. शहा म्हटले होते की, सर्व काही जाहीर करायचे नसते. त्यांच्या या विधानामुळे दोघांच्या भेटीत झालेल्या चर्चेला राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली होती. आज प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या चर्चाना कुठे तरी थांबवण्यात येईल.
यापूर्वी पण महाराष्ट्रातील नेत्यांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगितले होते. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अशा प्रकारची कोणतीही भेट झाले नसल्याचे म्हटले होते. त्यांनी तर हे वृत्त जाणून बुजून पसरवले असल्याचे म्हटले होते. आता ह्या विधानावर राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने स्पष्टीकरण दिल्यानंतर चर्चा थांबतील.