नवीदिल्ली : कंगना रानौत पहिल्यापासून आपल्या विधानांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. मात्र केंद्र सरकारने कंगनाला विशेष दर्जाची सुरक्षा पुरवल्या नंतर कंगनाने अनेक मोठी वक्तव्य केल्याचे दिसून आले. तिला ही सुरक्षा पुरवण्यामागचं खरं कारण केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितलं. कंगनाच्या सुरक्षेबाबत तिच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचं रेड्डी यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते कंगनाचे वडील
कंगना रणौत सोशल मीडियावर तिची मतं मांडत असल्याने महाराष्ट्रातील काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला. तिला धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तिला सुरक्षा पुरवण्यात यावी,’ अशा आशयाचं निवेदन कंगनाच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना दिलं.
त्यानंतर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला या परिस्थितीची कल्पना दिली, असं रेड्डी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. मात्र या सुरक्षेसाठी खर्च करण्यात येणारा पैसा कोण देणार याबाबत त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही.
कंगनाने मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर तिच्यातील आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला. मुंबईत येऊ नकोस अशा धमक्या अनेकांनी दिल्यामुळे त्यांना आव्हान देत ९ सप्टेंबर रोजी मुंबईला येणार असल्याचं कंगनाने स्पष्ट केलं. त्यापूर्वी तिला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली.
Read Also
मराठा आरक्षण हे केंद्र आणि राज्य सरकारच्या राजकारणाचा बळी आहेhttps://t.co/UlBOHIfuDJ@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @Chh_Udayanraje @YuvrajSambhaji @PawarSpeaks #sabhajibriged
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 12, 2020