लखनऊ : आज गेली अनेक वर्ष बाबरी मशीदचा प्रतिक्षेत राहीलेला प्रश्न सुटला आहे. बाबरी मशीद प्रकरणी लखनऊच्या विशेष न्यायालयाकडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अडवाणी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केले असून आपण आनंदी असल्याचे म्हटले आहे. अडवाणी यांनी म्हटले आहे की, “बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. या निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वैयक्तिक आणि भाजपचा विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध होते”. तसेच, त्याच जागी भव्य राम मंदिर उभे केले जाणार आहे.
I wholeheartedly welcome the judgement by the Special Court in #BabriMasjidDemolitionCase. The judgement vindicates my personal and BJP's belief and commitment toward the Ram Janmabhoomi movement: Lal Krishna Advani after being acquitted by Special CBI Court, Lucknow pic.twitter.com/7E95Q1vCNp
— ANI (@ANI) September 30, 2020
दरम्यान या प्रकरणावरून एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी चिथावणी दिली होती आणि हे संपूर्ण जगानं पाहिलं, अशा शब्दांत भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केलं. ‘बाबरी मशीद पाडण्यासाठी कट रचला गेला. मशीद पाडली जाईपर्यंत तुम्ही राजीनामा देऊ नका, असं आडवाणींनी कल्याणसिंह यांना सांगितलं होतं. पुढे हेच कल्याणसिंह राज्यपाल झाले. आडवाणी उपपंतप्रधान झाले. उमा भारती केंद्रात मंत्री झाल्या. बाबरी पाडून त्यावरच या सगळ्या नेत्यांची त्यांची कारकीर्द उभी राहिली,’ असं ओवेसी म्हणाले.
हिंसाचार केल्यास न्याय मिळतो, असा संदेश देणारा निकाल सीबीआयच्या न्यायालयानं दिल्याचं ओवेसी म्हणाले. ‘लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढली. त्यावेळी हिंसाचार झाला. जाळपोळ झाली. घरं पेटवून देण्यात आली. कुटुंब उद्ध्वस्त झाली. एक धक्का ओर दौ, बाबरी मशीद तोड दो, अशा घोषणा उमा भारतींनी दिल्या होत्या. मशीद पाडल्यानंतर लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनी मिठाई वाटली होती. त्यांनी राजकीय लाभासाठी मशीद पाडली. पुढे यातूनच त्यांना सत्ता मिळाली आणि याच सगळ्यांची आज निर्दोष मुक्तता झाली,’ असं ओवेसी म्हणाले.
Read Also :
आपल्या देशात देवींच्या मूर्तींची पूजा केली जाते पण… हाथरसर घटनेवरून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या भावना https://t.co/SA1fTZYk3u#Jitendraawhad #NCP @Awhadspeaks #YogiResignNOW #JusticeForManishaValmiki
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020