मुंबई : नुकतच राज ठाकरेंनी महाविकास आघाडीचे मंत्री उदय सामंत यांना फोन करून ग्रंथालय सुरु करण्याबाबत सांगितले होते त्यानंतर आता ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते मात्र ग्रंथालय सुरु करण्यासाठी कोणी कोणाला फोनाफोनी केली म्हणून ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असा टोलाही उदय सामंतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला.
राज्यातील ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय तत्त्वता आठ दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे. ही ग्रंथालय सुरू करतानाचे नियम येत्या दोन चार दिवसात तयार होईल. त्यानंतर राज्यातील ग्रंथालये सुरू होतील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. कोल्हापुरात अंतिम वर्षांच्या परीक्षांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
कोल्हापुरातून अंतिम वर्षांच्या परीक्षेसाठी एकूण 74 हजार 11 विद्यार्थी परीक्षेला बसले आहे. त्यातील 50 हजार विद्यार्थी ऑनलाईन तर 13 हजार विद्यार्थी ऑफलाईनद्वारे परीक्षा देणार आहे. कोल्हापुरात 293 सेंटरवर ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच जर परीक्षेदरम्यान एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली तर त्याला नंतर परीक्षा देता येईल, अशी सोय करण्यात आली आहे, असेही उदय सामंत म्हणाले.
Read Also
बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का ? संजय राऊत यांचा खोचक टोलाhttps://t.co/jXQwBO5GuM#SambhajiBhide #SanjayRaut #Shivsena #Udayanrajebhosale
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 9, 2020