औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजनाचा कोणता विचार नसल्याचे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत स्पष्ट केले आहे. उदय सामंत म्हणाले की, उस्मानाबाद उपकेंद्राला किंवा लातूर येथे नवीन विद्यापीठ करण्याचा कोणताही मानस नाही.
सामंत म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाव उंचावण्याचे काम महाविकास आघाडी शासन करेल.लातूर येथे स्वतंत्र तसेच उस्मानाबाद उपकेंद्राचे पूर्ण विद्यापीठ करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा गैरसमज पसरविला जात आहे
सामंत यांनी माहिती दिली की, पैठण येथील संतपीठाच्या कामासाठी पुढील काही दिवसात निर्णय निघेल. या विद्यापीठाला संत तुकोबाराया यांचे नाव दिले जाणार आहे. यासाठी 22 कोटी रुपयांचा निधी सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने द्यावा, नंतर तो शासनाकडून दिला जाईल.