नवीदिल्ली : उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात ‘अयशस्वी’ मुख्यमंत्री आहेत असं म्हणत भाजपाने हल्लाबोल केला आहे. बिहार भाजपाचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेनं आपलं नाव बदलून ‘बाबर सेना’ करावं असं देखील म्हटलं आहे. यासोबतच यशस्वी मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावं असा सल्लाही निखिल आनंद यांनी दिला आहे.
“मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे सुशांत सिंह राजपूत याला न्याय मिळवून देण्याविरुद्ध उभे राहिले. सीबीआय चौकशीचा विरोध करत राहिले, इतकंच नाही तर बॉलिवूडच्या ‘बाबा – बेबी – मुव्ही माफिया – ड्रग माफिया आणि अंडरवर्ल्ड टोळक्यातील आरोपींसोबत ते उभे राहिलेत. आश्चर्य वाटतं की आपल्या राजकीय निराशेची कुंटा मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एक लोकप्रिय महिला कलाकार असलेल्या कंगना राणौत हिच्याशी दोन हात करण्यासाठी आपलं संपूर्ण सरकार, पोलीस – प्रशासन व्यवस्था आणि आपला पक्ष शिवसेनेलाच दावणीला बांधला आहे’ असं म्हणत निखिल आनंद यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतके खालच्या पातळीवर जाणारे राजकीय व्यक्ती असतील हे देशाच्या जनतेला माहीत नव्हतं. गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत बडबड करत आहेत आणि सोबतच मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका पक्षपाती कारवाई करत आहेत, ती थेट उद्धव ठाकरेंच्या निर्देशावरून आणि इशाऱ्यावरूनच होत आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबाचा वारसा आणि विचारधाराही पणाला लावली” असं निखिल आनंद यांनी म्हटलं आहे.
Read Also
एक मराठा लाख मराठा म्हणत आरक्षणासाठी लातूरमधील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्नhttps://t.co/JMSMdhzc6w
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 10, 2020