मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईकर आज निवडणुकांची वाट पाहत आहेत. फक्त महापालिकाच नाही तर विधानसभेच्या निवडणुकाही लवकरातच लवकर घ्याव्यात. अनेकांनी या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नसल्याचं म्हटलं आहे. पण आता मुंबईत मुंबईकर म्हणून सगळे एकत्र झाले आहेत. त्यावेळी यांनी हिंदुत्वात मराठी, अमराठी म्हणत फोडण्याचा प्रयत्न केला होता. तेदेखील आता मला येऊन भेटत आहेत. मराठी माणसांमध्येही फुट पाडण्याचा प्रयत्न केला होता. आजसुद्धा करत आहेत. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये मुंबईकर यांना चांगला धडा शिकवणार? असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
या सरकारने राज्याला अपंग करून सोडलंय; जयंत पाटलांची शिंदेंवर घणाघाती टिका
युती झाली तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी तुम्ही देश सांभाळा, मी महाराष्ट्र सांभाळतो म्हटलं होतं. पण तुम्ही देशात तर पसरू देत नाही. दिल्लीत लाल किल्ल्यावर जाऊन भाषण करण्याची आपली इच्छा नाही. पण निदान महाराष्ट्रात आणि मुंबईतही जागा देणार नसाल तर युतीला अर्थ काय? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे. वर्षा सोडून निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं. त्या अश्रूचं मोल मला आहे. त्या अश्रूंची किंमत या विश्वास घातक्यांना चुकवायला लागल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही, असा देखील उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
“मुलाखत घेणारे, देणारे आणि मुलाखत छापणारे सुद्धा घरचेच”; मनसेचा ठाकरेंवर शाब्दिक हल्ला
राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. आदित्यच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी उसळत आहे. यांना धडा शिकवायचा हीच चर्चा आहे. तसेच ऑगस्टमध्ये बाहेर पडणार असून गेल्या आठवड्यात जिल्हाप्रमुखांना काही सुचना केल्या आहेत. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जेव्हा मी राज्यात फिरू लागेन तेव्हा सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. त्या दौऱ्यात येण्यासाठी ही कामं सोडावी लागतील म्हणून थांबलो आहे. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी फक्त लाईव्ह मॅच पाहतोय”; फडणवीसांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर खोचक प्रतिक्रिया
महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचं तुफान निर्माण करावचं लागले. आणि ते आहेचय लोकांच्या मनात, ह्यदयात तुफान आहे. फुटीरांनी तुमच्याकडे गद्दार म्हणू नका अशी विनंती केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की म्हणून तर गद्दार नाही विश्वासघातकी म्हणत आहे. त्यांचाही मान ठेवला असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन अद्याप कायम आहे. मी तर शिवसेनेचाच पक्षप्रमुख आहे. मुख्यमंत्री होईन असं म्हटल नव्हतं. पण आता वचन पूर्ण झालं म्हणून मी काय दुकान बंद करून बसणार नाही. मला शिवसेना वाढवायची आहे आणि तो प्रयत्न जर मी सोडणार असेन तर मग पक्षप्रमुख पदाला अर्थ नाही असं देखील ते म्हणाले.
Read also
- “महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचं तुफान निर्माण कराव लागेल”; उद्धव ठाकरे
- “देव करो, तुम्हाला पुढचं बोधचिन्ह खंजिरच मिळो”; सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला चिमटा
- “उद्धव ठाकरेंनी अनेकांना मारण्याच्या सुपाऱ्या दिल्या”; राणेंनी यादीच वाचून दाखवली
- “उद्धव ठाकरेंना जवळून ओळखतो, अंगात कपटीपणा अन् खोटारडेपणा”
- “दिपक केसरकर हा अतिशय भामटा अन् लबाड माणूस आहे”; शिवसेना नेत्याची जहरी टिका