मुंबई : मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरेने काय केलं, मराठ्यांना फक्त फसवण्याच काम मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत, धनगरांना आरक्षण कधी देणार आहेत? उद्धव ठाकरे हा मराठ्यांचा द्वेष करणारा माणूस असून त्याने समाजाची नुसती फसवणूक करण्याचं काम लावलंय अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
उद्धव ठाकरेंनी दादागिरीची भाषा करु नये, गांडूळाची भाषा करतो, काय मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी त्याने काय केलय? आधी बेळगाव कारवार बद्दल बोल नंतर ३७० विषयी बोल अरे अधिकारी हस्तायत तुम्हाला तुम्ही बुद्धू मुख्यमंत्री आहे. कालच भाषणही द्वेषाने भरलेलं होत. अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.
निर्बुद्ध आणि बेजाबदार विधान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. हिंदुत्वाशी बेईमानी करून सत्ता मिळवली आणि आता हिंदुत्वाच्या गप्पा मारतायत खर तर शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
उद्धव ठाकरे हे पुच्छट माणूस असून त्यांची नेत्रुत्व करण्याची लायकि नाही म्हणूनच त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी नव्या जबाबदाऱ्या दिल्या नाहीत, त्यांनी नेहमी बाळासाहेब ठाकरेंना छळलंय, सातत्याने अपमान केला आणि तो माणूस आज आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना भवनासमोर गडकरी चौकात दशहरा मेळावा घ्यावा अशी इच्छा बाळासाहेबांची होती पण उद्धवने ऐकलं नाही. वडिलांचं एकल नाही, शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली आम्ही केसेस अंगावर घेतल्या आता हा उद्धव ठाकरे कोण? हा कसला मुख्यमंत्री आहे? मी निषेध करतो अशा गोष्टींचा असा हल्ला नारायण राणेंनी केला आहे.
Read Also :
शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही : नारायण राणे https://t.co/Tvs62ALlLN @MeNarayanRane
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 26, 2020