मुंबई : राज्यात अभिनेत्री कंगना रानौतवरून सुरु असेलल्या वंदंगावर मुख्यमंत्री उद्धव उठाकरे यांनी एका वाक्यात आपली बाजू मांडली आहे.
‘महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय’, मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून, वेळ आल्यावर मी या राजकारणावरही बोलणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. सध्या विषय कोरोनाचा आहे, त्यामुळे कोरोना व त्यावरील उपाययोजना याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. माझे कुटुंब-माझी जबाबदारी याचं पालन करण्याचंही उद्धव ठाकरेंनी केले.
कुटुंबातील 50-55 वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि अन्य व्याधी / लक्षणांची माहिती घ्या व यंत्रणेस कळवा. फेस टु फेस बोलु नका. ऑनलाइन खरेदीवर भर द्या. दुकानात गर्दी करू नका, सॅम्पलना हात लावू नका. सार्वजनिक वाहनातून फिरताना बोलू नका. ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे.. त्यामुळे 80% ऑक्सिजन हा प्रथम आरोग्य सेवेसाठी देणार, उद्योगासाठी देण्यास दुय्यम महत्त्व देण्यात येणार. नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या विभागाची जबाबदारी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा, मराठा आरक्षणाला मिळालेली तात्पुरती स्थगिती आणि कंगना व शिवसेना यांच्यात पेटलेला वाद यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय बोलतात, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या सुरुवातीलाच कंगना व शिवसेना वादावर अप्रत्यक्षपणे बाण चालवला. कुणाचेही नाव न घेता, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात आपली बाजू मांडत, राजकारण सांगितले.