अंतिम वर्षांच्या परीक्षाबाबत यूजीसी आणि राज्य सरकारमध्ये मदभेद निर्माण झाले आहेत. राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम आहे. न्यायालयात 10 ऑगस्टला याचा निकाल लागणार आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात असे आवाहन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेयर ट्रस्टतर्फे गोरेगावमध्ये कोकणातील १६ महाविद्यालयांना १०० संगणक देऊन कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला होता. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पदवी परीक्षेची केस कोर्टात चालली आहे. १० तारखेला निर्णय आहे. त्यामुळे मी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करते, जो काही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, त्याचा सोक्षमोक्ष १० तारखेला लावा.
केंद्र सरकार नवीन शैक्षणिक धोरण आखत आहे, याबाबत शिक्षक व प्राध्यापक वर्गाच्या सूचना मला मिळाल्या, तर त्याबाबत आम्हाला आमचे मत मांडता येईल, असे देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.