नवी दिल्ली : भाजप नेते वरुण गांधी यांनी महाराष्ट्र सरकारने समित ठक्करवर केलेली कारवाई ही लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा आरोप केला आहे. ठाकरे सरकारने कारवाईसाठी उचलले पाऊल देशातील लोकशाहीसाठी घातक असल्याचे ते म्हणाले.
समित ठक्करने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पूत्र तथा कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका करणारे टि्वट केले होते. याप्रकरणी समित ठक्करला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे.
सुरुवातीला त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर ती 2 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. महाराष्ट्र सरकारच्या या कारवाईवर वरुण गांधी यांनी नाराजी जाहीर केली आहे.