मुंबई : गुरुवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासरचिटणीस प्रियंका गांधी हे दिल्लीहून हाथरस येथे रवाना झाले. पीडित परिवाराला भेटून त्यांची विचारपूस आणि सांत्वन करणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. मात्र, एक्सप्रेस वे वर राहुल-प्रियंका यांच्या गाड्यांचा ताफा रोखण्यात आला. तसेच पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गदारोळात राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत योगी सरकारवर टीका केली आहे.
हाथरस प्रकरणाती पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राहुल गांधींना घाबरले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. पीडित परिवाराची भेट घेणे आमचा अधिकार असल्याचे मत त्यानी मांडले.
दरम्यान , राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते देखील पायी प्रवास करत होते. मात्र पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसंच राहुल गांधी यांची कॉलर पकडून ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासोबत केलेल्या वर्तनानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी तसंच इतरही नेत्यांनी संताप व्यक्त केलाय.
Read Also :
रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ! राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोलhttps://t.co/25KtPtuMZo#RahulGandhi #SupriyaSule #sharadpawar #NCP #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020