बीड : मागील काही दिवसांमध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी बीड भागाचा दौरा केला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली असून, शेतकऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणाऱ्या बाळासाहेबांचाच वारसा आपण चालवत आहोत, हे उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावे. अन्यथा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडून द्यावी, असे विनायक मेटे म्हणाले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात असत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई सोडून शेतकऱ्यांच्या शेतात जावे, असेही विनायक मेटे म्हणाले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांनी यांनी बीडसह शिरूर तालुक्यातील पौंडूळ, खांबा – लिंबा, खालापुरी या गावातील नुकसानीची पाहणी केली.