मुंबई : मराठा आरक्षण हे राजकीय पोळी भाजण्याचा विषय नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईत आम्ही सरकारला सहकार्य करू, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
“मराठा आरक्षणावरून राजकारण करू नये.आमच्या सरकारच्या काळात अनेकांनी राजकारण केले, पण आम्ही राजकारण करणार नाही. मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान अण्णासाहेब पाटील यांनी दिले. समाजाला आरक्षण मिळवून देणे हीच त्यांना खरी आदरांजली.” , असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सरकार मराठा समाजासोबत आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई जिंकणार आहेत. न्यायालयीन लढाईसाठी तज्ज्ञ वकीलांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Read Also
आज शेतकरी संघटनांचा भारत बंद आंदोलन ‘या’ संघटनांंनीही दिला पाठिंबा https://t.co/gdR6Y44ILf @rajushetti @BhatkhalkarA
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 25, 2020