रायगड : देशाला लोकशाहीच्या माध्यमातून स्थिर सरकार हवे आहे आणि ते २०१४ पासून या देशात एनडीएरुपाने बघायला मिळत आहे. आताही ४०० पार आकडा गाठायचा आहे. असे म्हणत अनंत गीते तुम्ही कधी काळी ज्या भाजपच्या सहकार्याने निवडून येत होता. तेव्हा तुम्हाला लोकशाही धोक्यात आहे हे जाणवत नव्हते. मात्र आता लोकशाही धोक्यात आणि ईव्हीएमवर संशय व्यक्त करत आहात हे आक्षेपार्ह आहे. असं म्हणत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी गितेंवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीव गुहागर विधानसभा मतदारसंघात श्रृंगारतळी येथे महायुतीची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…नरेंद्र मोदी की राहुल गांधी, आगामी पंतप्रधानांबाबत पुणेकर नेमकं काय म्हणतात?
सुनील तटकरे यांनी अनंत गिते यांचा चांगलाच समाचार घेतला. गितेंनी केलेल्या टिकेवर तटकरे म्हणाले की, ज्यांना ३० वर्षे या मतदारसंघात सेवा करण्याची संधी दिली. त्यांची भाषा घसरली आहे. टीका करा. परंतु सिद्धांतावर करा. भाषा घसरलेली टीका नको. अनंत गीते तुम्ही तुमच्या निष्क्रियतेमुळे पराभूत झालात. असे म्हणत आम्ही आमच्या कामाची यादी तोंडपाठ सांगू शकतो. असा इशाराही त्यांनी दिला. तर आम्हाला कामाच्या यादीचा कागद हातात घ्यावा लागत नाही. कारण आम्ही जनतेची हृदयापासून कामे केली आहेत… मात्र तुम्ही काय काम केले हे तुम्हालाच शोधावे लागते आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आठ वर्षे भाजपच्या सहकार्याने अनंत गीते तुम्ही या मतदारसंघात निवडणूक लढलात. हे सोयीस्करपणे विसरलात. पावसाळा आला की ‘डराव डराव’ चा आवाज आपल्याला ठिकठिकाणी ऐकायला मिळतो. तसा अनंत गीते फिरायला लागले की निवडणूक आली हे समजायचे. असा घणाघात देखील तटकरेंनी केला.
हेही वाचा…“तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी महायुतीचाच खासदार हवा”
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवर भारताने गौरवशाली स्थान मिळवले आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील तरुण रोजगाराच्या माध्यमातून आपल्या मातीशी जोडला कसा जाईल यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. आपण सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी एकत्र आलो आहोत. जनतेच्या हितासाठी सत्तेत सहभागी झाले पाहिजे हे विचार घेऊन आम्ही सत्तेत सहभागी झालो असे सांगतानाच ज्या मतदारसंघाने मला ताकद आणि आपल्या हदयात महत्वपूर्ण स्थान दिले त्यांच्यासाठी सदैव काम करायचे आहे.
दीर्घकाळ रेंगाळलेल्या मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणाला खरा न्याय दिला आहे. याशिवाय कोकणाचे भवितव्य बदलणारा अटलसेतूही पूर्ण झाला आहे. येत्या काळात महायुतीचा खासदार म्हणून काम करताना भारत सरकारच्या ज्या ज्या योजना असतील त्या मतदारसंघात राबवणार असून गुहागरचा विधानसभा मतदारसंघ इतर विधानसभा मतदारसंघापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…“श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खाल्ले “, मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रावर गंभीर आरोप
हेही वाचा… मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी ! मुरलीधर मोहोळ
हेही वाचा..पुण्यात मोहोळांची की धंगेकरांची ताकद ? ; आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पुणेकरांचं मतं काय?