राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करत आहेत. शेतीचं नुकसान झाल्यानं रडू नका. खचून जाऊ नका. आलोय ना मी आता घाबरू नका. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी धीर दिला
येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तुळजापूरमधील काटगाव इथे पाहणी केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा उभं करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही, जे करुन ते तुमच्या समाधानासाठी करु, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“आज-उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल. तोपर्यंत पंचनामे 80-90 टक्के पूर्ण झाले आहेत. अंदाज आलेला आहे. लवकरात लवकर पूर्ण ताकदीनिशी तुमचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही. ते करु तुमच्या सुख-समाधानासाठी करु. धीर सोडू नका, खचून जाऊ नका. पुन्हा आपलं आयुष्य जोमाने सुरु करु यासाठी तुम्हाला दिलासा द्यायला आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला मी इथे आलोय. काळजी करु नका, हे तुमचं सरकार आहे. तुम्हाला पूर्ण ताकदीनिशी मदत केल्याशिवाय राहाणार नाही हे वचन तुम्हाला देतो,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना दिली.
Read also :
सरसकट ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही – अब्दुल सत्तारhttps://t.co/0EW6fYMeor#AbdulSattar #Shivsena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 21, 2020