सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षाकडून अप्रत्यक्षपणे आरोप होत आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून टाकत माझ्याविरुद्ध केवळ गलिच्छ राजकारण सुरू आहे. पण मी संयम बाळगलाय, असं म्हणत एक पत्रक जारी केले होते.
त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजपने त्यांना उलट सवाल केला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते, आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या त्या विधानाचा अर्थ लोकांनी कसा घ्यायचा, असा सवाल केला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर पत्रक शेअर करून आपले मत व्यक्त केले आहे.
“मी आजही संयम ठेवलेला आहे’… या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेने काय घ्यावा? ही धमकी आहे का? संयम सुटला तर काय कराल याचाही खुलासा केलात तर बरे होईल.” असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर-
बॉलिवूडमधील अनेक कलाकार माझे मित्र आहेत व तो काही गुन्हा नाही. सुशांत सिंह प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. माझ्याविरुद्ध केवळ गलिच्छ राजकारण सुरू आहे. पण मी संयम बाळगलाय, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य यांच्या या वक्तव्यावरून भाजपच्या एका मंत्र्याने, ‘मी आजही संयम ठेऊन आहे’ अशा प्रकारचे उद्गार काढणे याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा? संयम सुटला तर काय करणार आहात हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळण्याची गरज आहे. आदित्य यांच्या एका सहकाऱ्यावर सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचे आरोप झाले होते, तशा पद्धतीचे काही करणे अपेक्षित आहे काय? लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण, असे भातखळकर यांनी विचारले आहे.
'मी आजही संयम ठेवलेला आहे'…
या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेने काय घ्यावा? ही धमकी आहे का? संयम सुटला तर काय कराल याचाही खुलासा केलात तर बरे होईल. pic.twitter.com/0nlhocBEXZ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 5, 2020