मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागांचे नुकसान झाले आहे या मध्ये शेतकऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राज्य सरकारला यावरुन टार्गेट करुन जोरदार टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
नेत्यांचे काही फोटो शेअर करत त्यांनी “सत्ता गेल्यावर सगळेच जमिनीवर येतात” अशा आशयाचं ट्विट करीत फडणीवसांना चिमटा काढला. सत्यजित तांबे यांनी सुरुवातीला ट्विट करताना म्हटलं की, “माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहिजे. सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात.”
दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी फडणवीस सरकारमधील नेत्यांचे विमानातून पूरस्थितीची पहाणी करतानाचे फोटो तसेच ठाकरे सरकारमधील नेत्यांचे प्रत्यक्ष जमिनीवरुन पूरस्थितीची पहाणी करतानाचे फोट पोस्ट केले आहेत. तसेच या फोटोंना त्यांनी ”फरक, जमिनीचा व हवेचा!” असं कॅप्शनही दिलं आहे.
माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहीजे… सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात.
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) October 19, 2020