हिंगोली: महाराष्ट्रात सध्या जागतिक महामारीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरे आणि आता ग्रामीण भागात देखील या महामारीचा शिरकाव झाला आहे. त्यातच अपुरा ऑक्सिजन चा साठा , रेमेडीसीवर चा तुटवडा आणि बेड्स ची कमी संख्या यामुळे अडचणींमध्ये भर पडत आहे. या महामारीत रेमेडीसीवर च्या पुरवठ्या वरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकारण बघायला मिळाले आहे. त्यातच आता हिंगोली मध्ये भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी शिवसेना यांमध्ये रेमेडीसीवरच्या पुरवठ्यावरून वाद निर्माण झाले आहेत.
हिंगोलीमध्ये सत्ताधारी शिवसेना आमदार संतोष बांगर व भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यात अनेक दिवसांपासून संघर्ष पेटला आहे. शिवसेना आमदार बांगर हे गरजू रुग्ण व नातेवाईकांना जागतिक महामारीच्या कठीण काळात चार महिन्यांनपासून, ऑक्सीजन बेड या सह रेमडीसिविर इंजेक्शन पुरवठा करत आहेत. नागरिकांचे आलेले फोन कॉल रेकॉर्ड करून, सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. मात्र आमदार बांगर यांच्याकडे रेमडीसिविर इंजेक्शन कुठून आले याची चौकशी करण्याची मागणी भाजपने करत उपोषण सुरू केले. भाजप नेते माजी आमदार गजानन घुगे यांनी या सगळ्या प्रकरणाची विशेष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
त्यावर आमदार संतोष बांगर यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. संतोष बांगर यांनी म्हटले आहे की आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने रुग्णांची सेवा करत असून, इंजेक्शन सह इतर औषधी प्रशासनाकडून रुग्णांना उपलब्ध करून देत असल्याचे सांगत लोकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून घरात राहावे. त्यामुळेच सोशल मीडियावर मला आलेले फोन कॉल हे रेकॉर्ड करून व्हायरल करत असल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले आहे. रुग्णांचे प्राण वाचत असताना चौकशी करण्याची मागणी अत्यंत चुकीची आहे असे देखील यावेळी ते म्हटले आहेत.