मुंबई : मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आल्यानंतर सरकारने निर्णय घ्यायला हवा होता. सरकारने त्यासाठी नियमावली बनवून मंदिर सुरु करण्याची गरज होती. मात्र, अजूनही निर्णय घेण्यात आला नाही. हे सरकार कशावरच गंभीर नाही. मंदिरांचा प्रश्न फक्त लोकांच्या आस्थेचा विषय नाही तर लोकांच्या आर्थिक उपजीविकेचासुद्धा प्रश्न आहे. यामुळे भाजप मंदिर उघडण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी असेल असं स्पष्टोक्ती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे.
दरेकर यांनी मंदिरं उघडणे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आणि मराठा आरक्षण आंदोलनावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेने “पहले मंदिर फिर सरकार” ही घोषणा दिली होती. मात्र, शिवसेनच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकार मंदिर उघडण्यापासून दूर का जात आहे, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला.
मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय कसा मिळेल अशी भूमिका सरकारकडे मांडली पाहिजे. पण, दुर्दैवाने समाजा-समाजात फूट पाडून राजकारण होत आहे. मुद्दामहून वाद चिघळत ठेवला जात आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी आहे. परीक्षा आणि नोकरभरती पुरता तरी मार्ग काढावा,अशी माझी सरकारकडे विनंती आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
Read Also :
कामाचा माणूसच पक्षात घ्या, भाजपला एक नंबरचा पक्ष करा, दानवेंचा कार्यकर्त्यांना सल्लाhttps://t.co/dUhgkJR7ak @raosahebdanve
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020