नाशिक : काल मुंबईत एका कार्यक्रमात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, त्यातच आता भाजपचे आणखी काही आमदार महाविकास आघाडी सरकारच्या गळाला शक्यता वर्तवली जात आहे, कारण आता मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा करून एक नवीनच गौप्यस्फोट केला आहे. आतापर्यंत भाजपमध्ये अनेक नेते जात होते.
भाजप त्यांच्या आमदारांना लवकरच सरकार येणार असल्याचे चॉकलेट दाखवत होते. मात्र, एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे या चर्चा बंद होतील, आता कुठं बॉक्स उघडलाय, भाजपचे अनेक आमदार आणि नेते संपर्कात आहेत लवकरच ते भाजपची साथ सोडतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
आज नाशिकमधील ज्येष्ठ नेते विनायक दादा पाटील यांचे निधनानं दु:ख झाल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले. विनायक दादा पाटील यांनी वनक्षेत्र आणि सामाजिक काम मोठ्या प्रमाणात केले होते, अशा भावना भुजबळ यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या पॅकेजची घोषणा आज करण्यात आली आहे. जवळपास १० हजार कोटी रुपयांची मदत आता महाविकासआघाडी सरकार शेतकऱ्यांना करणार आहे. यामध्ये फळबाग आणि इतर पिकांचे निकष ठरवून दिलेले आहेत. शेतीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार तर फळबागेसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी जाहीर करण्यात आले आहे.
Read Also ;
भाजपची सरकारे नसलेल्या राज्यांनी व्लादिमिर पुतीनकडून लस मागवायची का?…https://t.co/ac9v28EvR0 @ShivSena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 24, 2020