मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आणि राज्यात सरकारविरोधी रोष वाढू लागला. त्यानंतर ठाकरे सरकारने सर्व पक्षीय सदस्यांची बैठक बोलावली आणि मराठा आरक्षणविषयी सर्वांशी चर्चा देखील केली.त्यावर बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तापक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असं म्हंटल आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस बोलत होते.
उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे या दोनीही छत्रपती वंशजांना काही दिवसांपूर्वी तुम्ही मराठा आरक्षणासाठी समाजाचे नेतृत्व करा असे राजकीय वर्तुळातून आवाहन करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमकं यामध्ये कोणी नेतृत्व करावे असे विचारले असता दोघांमध्ये कोणताही वाद नाही त्यामुळे दोघांनीही नेतृत्व केले पाहिजे असे सूचक विधान फडणवीस यांनी यावेळी केले आहे. तसेच इतर कोणीही या मुद्द्यावरून छत्रपतींच्या घराण्यात फूट पाडू नहे असा इशारा देखील फडणवीस यांनी यावेळी दिला आहे.
मराठा आरक्षणामध्ये केंद्राकडून जी काही कायदेशीर मदत राज्याला लागेल ती सर्व केंद्र सरकार करेल असे देखील यावेळी फडणवीस म्हणाले. तसेच राज्य सरकारने वकीलांशी बोलून धोरण ठरवणे गरजेचे आहे असे म्हणत फडणवीस यांनी विनायक मेटेंच्या भूमिकेला दुजोरा दिला.
Read Also
माझी जात ब्राह्मण असल्यामुळे मला टार्गेट केलं जात आहेhttps://t.co/s7PH01ICUa#DevendraFadanvis #MarathaAarkshan #MarathiNews
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 17, 2020