पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात आता अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. निवडणुकीपुर्वी जे लोक पक्ष सोडून गेले होते. ते आता पुन्हा पक्षात येण्यास तयार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काही दिवसानंतर मोठे इन्कमिंग सुरू होणार असा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केलाय.
हेही वाचा..पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार आता गॅसवर
सुषमा अंधारे म्हणाल्या की, सर्व आमदारांमध्ये एक अस्वस्थता असल्याचं समोर येत आहे. पण संपर्कात असणारी माणसं नेमकी कोण आहेत. ते माहिती नाही. पण मराठवाड्यातल्या लोकांची शक्यता नाकारता येत नाही. कारण मराठवाड्यात तसं वातावरण आहे. अब्दुल सत्तारांच्या मनात देखील अस्वस्थता असू शकते. मी हे उदाहरण म्हणून सांगत आहे. कुणाला सोबत घ्यायचं किंवा किंवा नाही. हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात.
हेही वाचा..मंत्रीमंडळाचा विस्तार होणार की नाही ? सुनील तटकरे म्हणाले..
ज्यांना ब्लॅकमेल करून घेण्याचा प्रयत्न केला गेला ते आले तर स्वागत. नाईलजाई गेलेल्या लोकांना घ्यायला हरकत नाही. जे लोक ठरवून गेले. स्वत : च्या चुका लपवण्यासाठी पक्ष बदनाम केला. अशा लोकांना घ्यायला शिवसैनिक देखील सकारात्मक नाहीत. असं सांगतानाचा आमच्याकडे इन्कमिंग निश्चित सुरू होईल. विदर्भातील दोन मोठे नेते विधानसभेत आमच्या सोबत येणार असा दावा देखील त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना : आधी लोकसभेचं सभापतीपद मिळवा, नाही तर…
हेही वाचा…“देशात एनडीएचं सरकार चालवतांना नरेंद्र मोदींच्या नाकीनऊ येईल”