यवतमाळ : बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार संजय राठोड प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी काल पत्रकारांवर संताप व्यक्त केला. पुजा चव्हाण संबंधित संजय राठोड यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ आता शांत का झाल्या आहेत ? असा सवाल सगळीकडून उपस्थित केला जात आहे. यातच यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत चित्रा वाघ य़ांना प्रश्न विचारताच त्यांनी पत्रकारांवर आपला राग व्यक्त केला. यावरून काॅंग्रेसने त्यांना आता पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
पंजाला मशालीची साथ..! राहुल गांधीच्या यात्रेत आदित्य ठाकरेंची एंन्ट्री
महाविकास आघाडी सरकार असताना संजय राठो़ड प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ चर्चेत आल्या होत्या. पुजा चव्हाण हिला न्याय मिळून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. परंतु आता शिंदे- फडणवीस राज्यात आल्यानंतर चित्रा वाघ शांत झाल्याचं बघायला मिळालं. त्यातच आता त्यावरून त्या पत्रकारांना चांगल्याच भडकल्या.
जितेंद्र आव्हाड यांनी नेमका गुन्हा केला काय ? जयंत पाटलांचा सवाल
राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर संजय राठो़ड प्रकरणाविषयी चित्रा वाघ यांना सातत्याने विचारणा केली जात आहे. त्यामुळे अलिकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राठोड हा विषय माझ्यासाठी संपला आहे. असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. त्यातच काल देखील त्याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मला काही कायदा शिकवू नका, जा तुम्ही. तसेच तुम्ही सुपाऱ्या घेऊन मला प्रश्न विचारायला आले आहेत. असं म्हणत त्यांनी संजय राठोड प्रकरण आता चांगलंच झोबंल असल्याच दिसत आहे.
“आता मी लढायला तयार, फाशी दिली तरी चालेल पण..;” जितेंद्र आव्हाडांना अटक
त्यावरून त्यांच्यावर काॅंग्रेसने जहरी टिका केली आहे. कशाला एवढं खवळता? संजय राठोडांवर आरोप तुम्हीच केले होते ना….! मग आता प्रश्न विचारल्यावर मिरच्या का झोंबतायत ? असा खोचक सवालही केला. तसेच आता तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले त्यात पत्रकारांचा काय दोष. असा उपरोधिक टोला देखील काॅंग्रेसने चित्रा वाघ य़ांनी लगावला.
Read also
- “राष्ट्रवादीची साथ सोडा सांगून कंटाळलो, अन् निर्णय घेतला”; किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश
- “फडणवीस काल म्हणाले की, द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे, अन् आज आव्हाडांना अटक”
- “आव्हाडांना अटक करून मोगली सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला”
- “आव्हाड साहेबांची कोणतीही चुक नाही, त्यांनीच मला बाहेर काढलं”; मारहाण केलेल्या तरूणाचं स्पष्टीकरण
- “आम्हा सर्वांना जेलमध्ये जावे लागले तरी चालेल पण..;”सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा