सुशांत सिंगच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत असताना 2018 साली आत्महत्या केलेल्या मुंबईतील आर्किटेक्ट अन्वय नाईकच्या दोषींवर कारवाई करून त्याच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे संपादक (अर्नब गोस्वामी ) यांच्या नावाचा उल्लेख देखील असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हंटले होत.त्यानंतर आता यामध्ये काँग्रेसने थेट भाजप वर निशाणा साधत त्या वेळी अर्नबला का वाचवत होते ? तेव्हा सीबीआय भाजपाला का आठवली नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.
काय म्हणालेत ‘नेमकं’ सचिन सावंत आपल्या ट्विटमध्ये
सुशांत सिंह राजपूतची सुसाईड नोट नव्हती तरी सर्वांची चौकशी होत आहे.
मात्र अन्वय नाईक यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अर्नब गोस्वामीचा उल्लेखच केला नव्हता तर त्यांना दोषी ठरवले होते.
मग अर्नबला साधं चौकशीलाही फडणवीस सरकारने बोलावलं नाही ? अर्नबला का वाचवत होते ?
तेव्हा सीबीआय भाजपाला का आठवली नाही ?
अशा प्रकारचे अनेक प्रश्न सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.
#SushantSinghRajput ची सुसाईड नोट नव्हती तरी सर्वांची चौकशी होत आहे. #AnvayNaik यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अर्नब गोस्वामीचा उल्लेखच केला नव्हता तर दोषी ठरवले होते. मग अर्नबला साधं चौकशीलाही फडणवीस सरकारने बोलावलं नाही. अर्नबला का वाचवत होते? तेव्हा सीबीआय भाजपाला का आठवली नाही?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 8, 2020