मुंबई : मुंबईत उघड्या गटारीत पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या मुद्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळेच या महिलेची दोन लहान लेकरं आईला मुकली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शीतल दामा असल्फा घाटकोपर महापालिका चा उघड्या गटारीत पडल्या, मृतदेह वरळी त सापडला. ह्या मृत्यूला जवाबदार कोण ?? बी एम सी चे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर वर फौजदारी कारवाई हवी @BJP4Maharashtra@mybmc@Dev_Fadnavis pic.twitter.com/4d38yjGu4L
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 5, 2020
किरीट सोमय्या म्हणाले, शीतल दामा या महिला 3 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.30 ते 7 दरम्यान झालेल्या मुसळधार पावसात गटारात पडून वाहून गेली. या गटारांवर पुर्वी सिमेंटचे ढापे बसवलेले होते. परंतु जानेवारी दरम्यान गटारांचे दुरुस्तीचे काम केल्यावर त्यावर निकृष्ट दर्जाचे ढापे बसवण्यात आले होते. या महिलेचा मृतदेह पहाटे 3 वाजता वरळीतील नाल्यात सापडला आहे.
महिलेला 2 मुलं होती. महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे ती दोन लहान लेकरं आईला मुकली असल्याचा आरोप, सोमय्या यांनी केला. सोबतच बीएमसीचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.