पुणे : कोंढव्यात दीड वर्षाआधी पाणीपुरवठा सुरळीत सुरु होता मात्र यंदाच्या वर्षी पाऊस चांगला होऊन देखील असं काय झालं जेणेकरून कोंढव्याला गेल्या दोन महिन्यांपासून पाणीकपात होत आहे. महानगरपालिकेत भाजपचीच सत्ता आहे तरीदेखील काही मुजोर अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाणीकपात केली जात आहे असा घणाघात माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केला आहे.
सत्ताधारी असून भाजपची होणारी मुस्कटदाबी आज ओसंडून बाहेर पडली. माजी आमदार योगेश टिळेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यांच्या समवेत होते. मनीषा कदम, राजाभाऊ कदम ,राणी भोसले, रायबा भोसले ,स्वतः टिळेकर यांच्या मातोश्री नगरसेविका रंजना टिळेकर आणि शंभरावर कार्यकर्ते उपस्थित होते. योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या या आंदोलनांमध्ये टिळेकर यांनी आक्रमक पद्धतीने आपले म्हणणे मांडले तसेच संबंधित अधिकाऱ्याचा गांधीगिरी स्टाईलने पुष्पहार घालून सत्कार केला.
वातावरण चिघळू नहे आणि कायदा सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून योगेश टिळेकर यांच्यासह सर्व नगरसेवकांना ताब्यात घेतले तसेच कार्यकर्त्यांना देखील अटक केली.या आधी देखील टिळेकर यांनी अनेक प्रश्नांसाठी आंदोलने केलेली आहेत. यावेळेस देखील त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह गांधीगिरी स्टाईलने थेट अधिकाऱ्याचाच सत्कार केल्याचे पहायला मिळाले.
मागील ४ महिन्यापासून पाण्याच्या गंभीर समस्ये मूळे कात्रज कोंढवा परिसरातील नागरिक त्रस्त होते, दोन-दोन दिवस पाणी न येणे, पाणी आले तरी अवेळी येणे. काही भागात तर पाणी मध्यरात्री पहाटे १-२ वाजता सोडले जात होते. अधिकार वर्गा सोबत अनेक वेळी बैठका केल्या, व्हिजिट झाल्या, रोज फोन केले जात होते पण निष्क्रिय अधिकारी नगरसेवकांना विचारात न घेता मनाला वाटेल तसे आणि नागरिकांना त्रास होईल असे पाणी वाटप करत होते. या सर्व कारणामुळे कोरोना संसर्ग चा विचार करूनच स्थानिक नगरसेवक, रंजनताई टिळेकर, वृषालीताई कामठे,विरसेन जगताप, मानिषाताई कदम, रानीताई भोसले स्वीकृत नगरसेवक अनिल येवले, तुषार कदम तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते घेऊन स्वारगेट पम्पिंग स्टेशनला गांधीगिरी आंदोलनाचे नियोजन केले.
त्या अधिकाऱ्याची हार-फुले घालून आरती केली. परंतु मग्रूर अधिकाऱ्यामुळे आंदोलनला वेगळे वळण आले. त्या कारणाने योगेश टिळेकर आणि ५० कार्यकर्ते व ७ नगरसेवक यांना अटक झाली.
काळजी नसावी असे ५६ गुन्हे नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्ते अंगावर घेण्याची तयारी असते मोर्चे आंदोलन हे माझ्या साठी नवीन नाही. जर पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर १० हजार नागरिकांना घेऊन त्या मग्रूर अधिकाऱ्याच्या ऑफिस वर महामोर्चा होणार. मग किती लोकांवर गुन्हे दाखल करता बघूया ? असा इशाराच माजी आमदार योगेश टिळेकर यांनी दिला आहे.
माझी बांधिलकी जनतेशी आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कितीवेळा तुरुंगात जावे लागले तरी चालेल अशा प्रकारच्या भावना अटकेनंतर माजी आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केल्या आहेत. आपल्या सोशल मीडियावरून टिळेकर यांनी याबाबत भाष्य केले आहे.
माझी बांधिलकी जनतेशी..!
जनतेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावं लागलं तरी माझी जाण्याची तयारी आहे. पण गोरगरीब जनतेच्या हिता साठी मी शांत बसणार नाही. @PMCPune @BJP4PuneCity @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ChDadaPatil pic.twitter.com/vNOar61K2n— Yogesh Tilekar (@iYogeshTilekar) October 5, 2020
Read Also
मुंबई महापालिकेमुळेच ‘ती’ दोन लहान लेकरं आईला मुकली, किरीट सोमय्यांची जोरदार टीका
https://t.co/9hT2jBiSMp@KiritSomaiya
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020