IMPIMP
yogi yogi

हाथरस पिडीत कुटुंबाला भेटण्यासाठी ५ लोकांना योगी सरकारने दिली परवानगी

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. काल कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. आता यावर देशातील अनेक नेते टिका करत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार व त्यानंतर तिचा करण्यात आलेला अमानुष खुनामुळं सध्या देशात संतापाची लाट आहे.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पुन्हा निघाले हाथरस पिडीत कुटुंबाच्या भेटीला पुन्हा निघाले आहेत. दिल्लीतून ते आपल्या राज्यसभा आणि लोकसभेतील सर्व खासदारांना घेऊन हाथरसला निघाले आहेत. आता त्यांना योगी सरकार पिडीत कुटुंबाला भेटू देणार कि नाही हे बघन महत्वाच आहे. पण आता सर्वात महत्वाची बातमी येत आहे कि हाथरस पिडित कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधींसह ५ जणांना भेटण्याची परवानगी योगी सरकारकडून देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरण देशातील महत्त्वाचा मुद्दा बनला असून, योगी सरकारच्या कारवाईकडे देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारनं कारवाई करत पोलीस अधीक्षक, व इतर अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. योगी सरकारच्या या कारवाईवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सवाल उपस्थित करत राजीनाम्याची मागणी केली आहे.

हाथरसमध्ये १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचे देशभरात संतप्त पडसाद उमटले. विरोधकांनी योगी सरकारला घेरलं, तर आंदोलन करत लोक घटनेबद्दल आपला संताप व्यक्त करत आहे. घटनेवरून तीव्र पडसाद उमटत असतानाच योगी सरकारनं हाथरस प्रकरणात मोठी कारवाई करत या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबन केलं आहे.

योगी सरकारनं निलंबनाची कारवाई केल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना सवाल केला आहे. “योगी आदित्यनाथजी काही जणांना निलंबित करून काय होणार आहे? हाथरस पीडिता व तिच्या कुटुंबीयांना जो भयंकर त्रास देण्यात आला, तो कुणाच्या आदेशावर देण्यात आला? हाथरसचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे फोन रेकॉर्डस सार्वजनिक करण्यात यावेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या जबाबदारीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करू नये, देश पाहतोय, योगी आदित्यनाथजी राजीनामा द्या,” अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे.

 

Read Also :