मुंबई : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या पॅकेजची घोषणा आज करण्यात आली आहे. जवळपास १० हजार कोटी रुपयांची मदत आता महाविकासआघाडी सरकार शेतकऱ्यांना करणार आहे. यामध्ये फळबाग आणि इतर पिकांचे निकष ठरवून दिलेले आहेत. शेतीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार तर फळबागेसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी जाहीर करण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी मदतीसाठी केंद्राकडे याचना केली होती, केंद्र सरकारने महाराष्ट्राचा जीएसटीचा परतावा द्यावा अशी मागणीही करण्यात आली होती. तथापि सरकारमधील अनेक नेत्यांनी नुकसानग्रस्त विभागांची पाहणी केली होती. पण आता सरकाने मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौऱ्यात आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हटलं होत.
पण आता या मुदतीनंतर विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका होताना दिसत आहे, विरोधी पक्ष भाजपने सरकारने केलेली हि मदत अतिशय तुटपुंजी आहे अशी टीका केली आहे,यावर आता सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
आज पूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते.
Read Also :
‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे भाजपाच्या पोटात गोळा उठला आहे. https://t.co/hatRdxtFBN @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 23, 2020