मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा तरुणांमध्ये संतापाचे वातावरण पहायला मिळाले होते. त्यातच आरक्षनाला स्थगिती मिळाल्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती सुरु झाली तर नेमकं काय होणार असा प्रश्न अनेक मराठा तरुणांना पडलेला असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
राज्यामध्ये काही दिवसांतच पोलीस भरती केली जाणार आहे. मात्र या भरतीमध्ये 13 % जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 17, 2020
आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा तरुणांमध्ये सरकार विरोधात रोष असल्याचे दिसून आले होते त्यामुळे कोणताही चुकीचा मेसेज समाजापर्यंत जाऊ नये यासाठी आता गृहमंत्रालयाने दखल घेत हा निर्णय घेतल्याचे समजते.
याउलट छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.
संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये. @OfficeofUT @CMOMaharashtra pic.twitter.com/BHMU0IF4As
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 17, 2020