मुंबई : दिल्लीत कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण मिळाल्याचे पाहण्यास मिळाले. यात एका आंदोलकाचा देखील मृत्यू झाला आहे. दिल्लीतील हिंसाचारानंतर आता राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देखील संतप्त प्रतिक्रिया येत आहे. केंद्र सरकारला देशात अराजकता आणायची आहे का? असा सवाल या हिंसाचारानंतर शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरेंनी केला आहे.
देशात सतत आंदोलनं सुरु ठेवायची आणि काहीतरी वेगळा डाव साधायचा, असा विचार तर केंद्र सरकार करत नाही ना ? असे प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. ते मुंबईत बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांमध्ये काय झाले? शेतकऱ्यांशी चर्चा कोण करणार? हे आंदोलन कोणी चिघळवण्याचा प्रयत्न केला का?, या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, सत्य बाहेर येणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांचा संयम का सुटला, यामागे कोणीतरी वेगळेच होते का ? याचा विचार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
Read Also :
- … अन् अजित पवारांनी वाचले बाळासाहेब ठाकरेंनी कारागृहातून मीनाताईंना लिहिलेले पत्र
- ‘आज तिरंगा योगी सरकार के गिरफत में है’, त्या फोटावरून काँग्रेसने साधला निशाणा
- ‘माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवारसाहेबांनी दखल घेणं हे भाग्यचं’, पवारांच्या टीकेला दरेकरांचे उत्तर
- ‘हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल’, अमोल मिटकरींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- मुख्यमंत्र्यांचा विदर्भातील चौथा दौरा, विदर्भाशी बांधिलकी अधिक दृढ करण्याचा उद्देश