पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यात कारागृह पर्यटन या अभिनव संकल्पनेला सुरुवात झाली आहे. या पर्यटनाचा शुभारंभ आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर 150 वर्षे जुन्या येरवडा कारागृहातून करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या कारागृह पर्यटनाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. यावेळी महाराष्ट्र शासन कारागृह व सुधार सेवा विभागाच्या वतीनं आयोजित 'कारागृह पर्यटन' शुभारंभ ह्या कार्यक्रमात सहभागी झालो. याप्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला व कारागृहाशी संबंधित काही बाबींची माहिती घेतली. pic.twitter.com/6ujCPzYdJh
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 26, 2021
यावेळी अजित पवारांनी स्वतः शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांनी पत्नी मीनाताई ठाकरे यांना कारागृहातून लिहिलेल्या पत्राचे वाचन केले. यावेळी अजित पवारांनी येरवडा कारागृहाचे ऐतिहासिक महत्त्व, भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात कारागृहांचे विशेष महत्त्व देखील अधोरित केले.
या कारागृहात स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेते महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांच्यासह इतर नेते बंदिस्त होते. या कारागृहांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता ‘कारागृह पर्यटन’ ही वेगळी संकल्पना आहे, असे यावेळी अजित पवार म्हणाले.
Read Also :
- ‘आज तिरंगा योगी सरकार के गिरफत में है’, त्या फोटावरून काँग्रेसने साधला निशाणा
- ‘माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवारसाहेबांनी दखल घेणं हे भाग्यचं’, पवारांच्या टीकेला दरेकरांचे उत्तर
- ‘हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल’, अमोल मिटकरींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- मुख्यमंत्र्यांचा विदर्भातील चौथा दौरा, विदर्भाशी बांधिलकी अधिक दृढ करण्याचा उद्देश
- ‘हुकूमशाही सरकारला जनताच लोकशाहीचे प्रतीक हे सांगणं महत्वाचं’, वंचित आघाडी आंदोलन करणार