मुंबई : उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर आता लवकरच उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याची निर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे या संदर्भात गृहमंत्रालयाने कायदे व विधी विभागाकडे प्रस्ताव देखील पाठवला आहे.
”सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशार देत आहे जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधाराला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे.” असं योगी आदित्यनाथ यांनी एका सभेत बोलून दाखवलं होतं.
लव जिहाद हा शब्द गेल्या काही वर्षांपासून हा शब्द राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनला आहे. पण आता ते रोखण्यासाठी कायदाच करण्याचं पाऊल मध्य प्रदेश सरकारनं टाकलं आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, आगामी विधानसभा सत्रात शिवराजसिंह सरकारकडून लव जिहादच्या पार्श्वभूमीवर धर्म स्वातंत्र्य कायद्यासाठी विधेयक सादर केले जाणार आहे. कायदा तयार झाल्यानंतर अजामीनपात्र कलमांतर्गत खटला दाखल करून दोषींना पाच वर्षांपर्यंत कडक शिक्षा दिली जाईल.
Read Also :
‘फडणवीसांना उठबशा काढू द्या, त्यांना आम्हीच चितपट करणार’ मंत्री जयंत पाटलांची वल्गना
फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश
कोरोनामुळे दिल्ली-मुंबई विमानसेवा बंद होणार?
भगव्याचा रंग तुम्हीच फिका केला ; आशिष शेलारांचा सेनेवर हल्लबोल