पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी बीड जिल्ह्यातील घटनेवर ”दुर्देवी घटनांचे सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जागं व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं,” अशा आशयाचे ट्विट केले. त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपला ठाकरे सरकारवर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे.पार्थ यांच्या ट्विटमुळे मात्र पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात पार्थ यांच्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
बीड जिल्ह्यातील केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे (१८) या विद्यार्थ्याने ”मी मेल्यानंतर तरी केंद्र आणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझे मरण सार्थक होईल, अशी चिठ्ठी लिहून गळफास घेतला. बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने नीटची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
पुण्यात खासदार गिरीश बापट व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाला गुरुवारी सुरूवात झाली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना पाटील म्हणाले, पार्थ पवार यांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल सुरू आहे. पण याचवेळी पार्थ यांच्या भाजप प्रवेशावर ‘असा कुठलाही प्रस्ताव अजूनतरी आलेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षणाचा अध्यादेश केंद्राला काढता येणे कदापि शक्य नाही. आरक्षण हा राज्याचा विषय आहे. ही बाब इतकी वर्ष राजकारणात सक्रिय असणाऱ्या शरद पवारांना माहिती नाही का ? असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.
Read Also
रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ! राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोलhttps://t.co/25KtPtuMZo#RahulGandhi #SupriyaSule #sharadpawar #NCP #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020