मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेतील बहुमताच्या जोरावर अनेक अन्यायकारक कायदे नियमं लादायला सुरुवात केली आहे. ज्याचा विरोध आता पंजाब हरयाणा आणि दक्षिण भारतातील अनेक राज्ये करताना दिसत आहे. त्याचाच आधार घेत आज मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कृषी विधेयके राज्यसभेत मंजूरी केली. त्यांनतर राज्यात या कायद्याचा विरोध केला जात आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज कृषी कायद्यावर आपले भाष्य केले आहे. वडेट्टीवारांनी सांगितले की, कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हक्काच्या मार्केट कमिट्या उध्दवस्त करणारा कायदा आहे. यात शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचा प्रोटेक्शन नसणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी दाद नेमकं कुणाकडे मागायची असा प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.
या अंतर्गत पहिल्या वर्षी जास्त दर देण्यात येईल. त्यामुळे मार्केट कमिट्या आपोआप ओस पडणार. तसेच हा कायदा शेतकऱ्यांच्य़ा हिताचा नव्हे तर, कॉर्पोरेट सेक्टरच्या हिताचा आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. हा कायदा शेतकऱ्यांवर हुकूमशाही तसेच जुलूमशाहीचा आहे. भाजपने आणलेला हा कायदा रद्द झाला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे.
Read Also :
अनेक नेते पंचतारांकित रुग्णालयात, मात्र फडणवीस सरकारी रुग्णालयात: प्रवीण दरेकर https://t.co/TwumY0OTem @mipravindarekar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 31, 2020