‘किसान समन्वय संघर्ष समितीत सामील असलेल्या 208 संघटना याविरोधात संबंध देशभरात लढत आहेत. 25 सप्टेंबर रोजी या कायद्यांविरोधात देशभरात कृती करत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. संघर्ष समितीने या कायद्यांविरोधात देशभरात तीव्र आंदोलन करण्याची हाक दिली आहे. आज बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारचा विजय आणि शेतकऱ्यांचा पराजय झाला असला, तरी 25 सप्टेंबरच्या आंदोलनानंतर सरकारला माघार घ्यावी लागेल. सरकारला शेतकऱ्याचं म्हणणं ऐकावं लागेल आणि त्यासाठी पूर्ण शक्तीने काम केलं जाईल,’ असंही अजित नवले यांनी सांगितलं.
अजित नवले म्हणाले, ‘अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने केंद्र सरकारच्या या कृतीचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. संसदेत भाजपचं बहुमत असलं तरी, देशभरात रस्त्यावर शेतकऱ्यांचेच बहुमत आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा देशभरातील शेतकरी धिक्कार करत आहेत. किसान सभा आणि 208 शेतकरी संघटनांचा देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने या कायद्यांच्या विरोधात 25 सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. केंद्र सरकारचे जमीन अधिग्रहण बिलात बदल करण्याचे मनसुबे जसे उधळून लावण्यात आले होते, त्याच प्रकारे या कृषी कायद्याचा अंमल करण्याचे सरकारचे मनसुबे देशभरातील शेतकरी उधळून लावतील.
Read also