मुंबई : एकदा चुक झाली तर पुन्हा ती आपल्या मराठी माणसांकडून होत नाही. तशी आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीही नाही. परंतु हल्ली आपल्या महाराष्ट्रात तसं घडतांना दिसत नाही. राज्यपालानंतर, मंत्री, तसेच तीसरे मंत्रीही बोलतात. हे योग्य नाही. त्यामुळे आता राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवलं पाहिजे. मंत्र्यांनी त्याबाबत माफी मागावे अशी गर्जना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महामोर्चातून दिली आहे.
महापुरुषांचा अपमानाबाबत आज महाविकास आघाडीकडून महामोर्चाची हाक दिली आहे. त्या मोर्चात अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दोन दिवसानंतर राज्याचं हिवाळी अधिवेशन होत आहे. या हिवाळी अधिवेशनात आम्ही हा आवाज उठवणार आहे. त्यासाठी कायदा करावा लागला तरी आमची तयारी आहे. असंही अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील काही गावं कर्नाटक जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार कर्नाटक बॅंकेचा निर्णय घेतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या या चुकीच्या निर्णयात आपण आपला आवाज उठवला पाहिजे. तसंच तुमचं पुतना मावशीवरचं प्रेम आता सगळ्यांना समजलं आहे. असा टोलाही असंही अजित पवार यांनी लगावला.