मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 13 पेक्षा अधिक आमदार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. तर कॉंग्रेसच्या आमदारांना देखील बैठकीसाठी दिल्लीत बोलवले आहेत. तसेच शिवसेनेच्या आमदारांशी बैठक वर्षा या निवासस्थानी बोलवण्यात आली आहे. तर शरद पवार हे आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आघाडीतील 21 मतं फुटली कोणी बाजी मारली, कोणाची रणनिती फेल ठरली
एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे बाहेर जे वातावरण निर्माण केलं जात आहे. त्यात काही तथ्य नसून त्याबाबत लवकर आम्ही सर्व आमदारांसोबत बैठक घेणार आहोत. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये जो पॅटर्न भाजपने राबविला आहे. तो महाराष्ट्रात होणार नाही. अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
दहाव्या जागेसाठी लाड अन् जगताप यांच्यात लढत, पण गेम झाला तो चंद्रकांत हंडोरेंचा
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्रातील सर्व सहकाऱ्यांशी संपर्क साधत आहोत. राजकारणात अशा प्रत्येक प्रसंगाला सामारे जावे लागते. सरकार स्थापन करतांना देखील भाजपने असा प्रयोग केला होता. परंतु तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे भाजप हा आमच्यासोबत दुसरा डाव खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. हा डाव छातीवर नसून पाठीवर आहे आणि आम्ही पाठीवर नाही छातीवर डाव झेलणारे आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप
एकनाथ शिंदे हे एकनिष्ठ शिवसैनिक असून त्यांचं आयुष्य शिवसेनेत गेले आहे. शिवसेनेच्या अनेक संघर्षातमध्ये शिवसेनेत राहिले आहेत. त्यांची बाळासाहेब ठाकरे यांच्यावर एकनिष्ठ श्रद्धा आहे. त्यामुळे ते धोका देखील असं मला वाटत नाही. असंही राऊतांनी म्हटले आहे. राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत असताना आजच अनिल परब यांना इडीची नोटीस का पाठवली? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Read also:
- आघाडीत मोठा भुकंप; एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे 13 पेक्षा अधिक आमदार नॉट रिचेबल
- राष्ट्रवादीची पहिल्या पंसतीची मते निंबाळकर यांना, खडसेंना दुसऱ्या पसंतीची मते
- देश वेठीस धरण्यासाठी विरोधकांची धंदेवाईक दलालांशी हातमिळवणी! गोपीचंद पडळकर यांचा आरोप
- काॅंग्रेसने घेतलेले आक्षेप निवडणुक आयोगाने फेटाळले, मतमोजणीला सुरूवात होण्याची शक्यता?
- काॅंग्रेसला अवदसा आठवली, योध्यांचाही अपमान, निष्ठावंतांची किंमतच कशी कळणार?