मुंबई : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतावर काॅंग्रेसने आक्षेप घेतला असून त्याची तक्रार निवडणुक आयोगाकडे करणार असल्याची बातमी समोर येत आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतपत्रिका ही त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान पत्रिकेत टाकली असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं काॅंग्रेसने म्हटले आहे.
“पंकजा मुंडे अन् नाथाभाऊंची झालेली गळचेपी याचा फटका भाजपला बसणार”
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतपत्रिकेवर आक्षेप घेतला असून त्याची तक्रार आम्ही केंद्रीय निवडणुक आयोगाकडे देखील केली असल्याची माहिती काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी कितीही आक्षेप घेतला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. असं भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
“उमेदवार निवडून आल्यास संजय राऊत काय बोलणार ते आता मी पाहणार”; देवेंद्र भुयार
आजारी आमदारांना मतदान करताना मदत घेता येतो त्या पद्धतीची तरदूत देखील नियमात केली आहे. असं माजी विधीमंडळाचे सचिव यांनी अनंत कळसे यांनी सांगितले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत देखील हा नियम असून त्यावर आता निवडणुक आयोग काय निर्णय देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा”; भाजपच्या नेत्याचं सुचक वक्तव्य
दरम्यान, लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्यावतीने दुसऱ्यांनी मतदान केले आहे. त्यासाठी निवडणुक आयोगाकडे परवानगी घेण्यात आली होती. असं भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
Read also:
- आज कुणीही पावसात भिजलं तरी..; गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांना टोला
- “लक्ष्मण जगतापसारखा नेता कोणीच असू शकत नाही”; देवेेंद्र फडणवीसांनी मानले आभार
- “पुढचा मुख्यमंत्री प्रहारचाच, हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा”; बच्चू कडू
- “भाजपचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला”; खडसेही उपस्थित, राजकीय वर्तुळात चर्चा
- “सेनेला मतदान देण्यासाठी माझ्यावर मुख्यमंत्र्यांकडून दबाव”; रवी राणांचा गंभीर आरोप