मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीकरीता मतदानाला सुरूवात झाली असून आतापर्यंत १५० पेक्षा अधिक आमदारांनी मतदान केलं आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणार उभे असुन खरी लढत ही भाजप आणि काॅंग्रेसमध्ये बघायला मिळत आहे. अशातच आता भाजपच्या एका नेत्यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे.
“विधान परिषदेच्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांची जादू चालणार”; रामदास आठवले
विधिमंडळाच्या संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन तर काॅंग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र दहाव्या जागेसाठी भाजप आणि काॅंग्रेसने अतिरिक्त उमेदवार दिला असून यामध्ये काॅंग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात चुरस बघायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांनी एक ट्विट केलं आहे.
राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेसाठीही जगताप, टिळक मुंबई दाखल होणार
अनिल बोंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, काळ आला होता भाऊ किंवा भाईवर पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा, असं म्हणत त्यांनी काॅंग्रेसचे भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे भाई जगताप यांचा पराभव होण्याची शक्यता यामुळे राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
“पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजू, उद्याची निवडणूक आपणच जिंकणार”; उद्धव ठाकरे
दरम्यान, काॅंग्रेसकडे सध्या ४२ मते असून दुसऱ्या उमेदवारासाठी त्यांना अतिरिक्त १० मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्या पराभवासाठी रणनिती आखल्याचं बोललं जात आहे. मात्र काॅंग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आपल्या वाट्याची काही मते त्यांना देणार असल्याची बातमी समोर येत आहे.
काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा…#MLCElection2022 #MahaVikasAghadi
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) June 20, 2022
Read also:
- “मी पुन्हा येईन”, रोहित पवारांनी काढली फडणवीसांची जुनी आठवण
- “गद्दारी करून सत्तेत आलेल्या सरकारला आमदार योग्य उत्तर देणार”
- “भाजपला सत्तेबाहेर काढण्यासाठी काॅंग्रेसला सहयोग करा”; अग्निपथ योजनेवरून पटोलेंचं तरूणांना आवाहन
- “भारतीय संरक्षण दलासारख्या संस्थेशी छेडछाड करण्याचा भाजपचा प्रयत्न”; अग्निपथ योजनेवरून सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
- JNU मध्ये 12 वर्षे शिक्षण घेऊनही तुला कोणी मुलगी का दिली नाही? अग्निपथ योजनेवरून भाजपचा सवाल