मुंबई : राज्यातील मतदारांशी गद्दारी करून 24 ऑक्टोबर 2019 ला राज्यात सत्तेवर आलं. या सरकारला विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आमदार धडा शिकवणार आहेत. राज्यातल्या लोकांची असलेली नाराजी या निमित्ताने या मतदानातून पुढे येणार आहे. असं म्हणत भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला.
“पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजू, उद्याची निवडणूक आपणच जिंकणार”; उद्धव ठाकरे
राज्यसभेची निवडणुक ही चमत्काराची निवडणुक नव्हती तर नियोजनपूर्वक केलेल्या कामाचे यश होते. राज्यसभेवरील या विजयाची पुनरावृत्ती विधानपरिषदेच्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही. मतदारांशी गद्दारी करून सत्तेत आलेल्या या राज्य सरकारला जैसा कर्म करेगा वैसा फल देगा आमदार या पद्धतीनेच उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“देवेंद्र पेक्षा हितेंद्र पावरफुल ठरणार, कोणी कितीही लोटांगण घाला”
महाविकास आघाडीने आपले सर्व आमदारांना एकाच ठिकाणी ठेवलं आहे. त्याचबरोबर भाजपचे आमदार देखील ताज हाटेलमध्ये आहेत. उद्या विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. त्याचा निकाल त्याच दिवशी सायंकाळी लागणार आहे. भाजप आणि काॅंग्रेसमध्ये या निवडणुकीत चांगलीच लढत होणार असून यात कोण बाजी मारणार ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान, तर शरद पवार दिल्लीकडे रवाना”; राजकीय घडामोडींना वेग
दरम्यान, विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणार उभे राहिले आहेत. यामध्ये भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि उमा खापरे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर आणि शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमाश्या पाडवी तर काॅंग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Read also:
- “भाजपला सत्तेबाहेर काढण्यासाठी काॅंग्रेसला सहयोग करा”; अग्निपथ योजनेवरून पटोलेंचं तरूणांना आवाहन
- “भारतीय संरक्षण दलासारख्या संस्थेशी छेडछाड करण्याचा भाजपचा प्रयत्न”; अग्निपथ योजनेवरून सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
- JNU मध्ये 12 वर्षे शिक्षण घेऊनही तुला कोणी मुलगी का दिली नाही? अग्निपथ योजनेवरून भाजपचा सवाल
- “विधान परिषदेच्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांची जादू चालणार”; रामदास आठवले
- राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेसाठीही जगताप, टिळक मुंबई दाखल होणार