मुंबई : राज्यसभा निवडणुकीत झालं ते विधान परिषदेच्या निवडणुकीत होणार नाही. आतापर्यंत एकही मत फुटलेले नाही, जर फुटलं तर ते समोर येणार आहे. त्यामुळे उद्याची निवडणुक ही आपणच जिंकणार आहोत. असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेचा आज 56 वा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. त्यावेळी ते कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो, रोहित पवारांच्या भगतसिंग कोश्यारींना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
मला उद्याच्या निवडणुकीची चिंता नाही. चिंता करत बसलो तर शिवसेनाप्रमुखांनी माझ्या धमण्यांमध्ये जे भिनवलेलं आहे. त्याचा उपयोग काय? जय पराजय होत असते आणि उद्या तर आपण जिंकणारच आहोत. कितीही फाटलं तरी शिवसेनेने इतिहास दाखवलेला आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की आईचे दुध विकणारा नराधम शिवसेनेत नको, अनेकांनी शिवसेना मोठी केली आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“महंमद तुघलकी सारखी अग्निपथ योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी”; सचिन खरात
आमदार, मुख्यमंत्री खासदार उद्याच्या निवडणुकीत अजून वाढतील. त्यामुळे सर्व आता बोलण्याची गरज नाही. पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजू, मी उद्याची निवडणूक जिंकणारच असंही ते म्हणाले. शिवाजी पार्कवर ज्यावेळी नारळ फुटला होता. त्या नारळाचे पाणी माझ्या अंगावर उडले होते. आज मला त्याची इतकी मोठी जबाबदारी समजली आहे. असंही ते म्हणाले.
“घोडा बाजार जवळच आहे, त्याचा निकाल लवकरच लागणार”; बच्चू कडू
दरम्यान, यावेळी अग्निपथ योजनेवरून देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. अचानक योजना आणायची आणि त्याला अग्निवीर नाव द्यायचं पण शिकवणार काय? चार वर्षाने यांच्या नोकरीचा पत्ता नाही. असंही ते म्हणाले.
Read also:
- “देवेंद्र पेक्षा हितेंद्र पावरफुल ठरणार, कोणी कितीही लोटांगण घाला”
- “उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान, तर शरद पवार दिल्लीकडे रवाना”; राजकीय घडामोडींना वेग
- सेनेलाच मत देणार, शिवसेना आमदारांची भूमिका; तर मुख्यमंत्र्यावर काॅंग्रेसकडून दवाब
- “निवडणुकीमध्ये भाजप मतांसाठी दबाव, अन् दहशत निर्माण करतील”; संजय राऊत
- “आघाडीतील काही आमदारांशी भाजपकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न”; थोरातांचा खळबळजनक दावा