मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकरीता 20 जुन रोजी मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांना एकाच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत अपक्ष आमदारांची महत्वाची भूमिका ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
घोडा बाजार जवळच आहे. त्याचा निकाल लवकरच लागणार असून तो महाविकास आघाडीकडे झुकणार आहे. विहिर म्हटलं की, त्यामध्ये पाणीच असणार. विहीरीला पेट्रोल किंवा घासलेट लागलं तर तो आश्चर्याचा विषय ठरू शकतो. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात फोडाफोडी ही क्रमपाप्त आहे. आमचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असता तर आम्हीही मतांसाठी फोडाफोडी केली असती. असंही बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे.
केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला रोहित पवारांचा विरोध; अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना
विधान परिषद निवडणुकीत क्रमांनुसार मतदान होते. त्यामुळे एखाद्या आमदाराने पहिल्या पसंतीचे मत आपल्या पक्षाला दिल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीचं मत कोणाला द्यायचं हे त्याच्यावर अवलंबुन असतं. अशावेळी एखाद्या राजकीय पक्षाने आमदाराला दुसऱ्या पसंतीच्या मतासाठी फोन केला आणि मदत सांगितली तर त्यामध्ये वाईट काय ? असा सवाही बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
“आता भाजपला कोणत्याही निवडणुकीत जिंकणं अशक्य”; नाना पटोलेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीकरीता महाविकास आघाडीतील सर्व आमदारांना आता रेनाॅसा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याआधी राज्यसभेच्या निवडणुकीकरीता त्यांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीत दहाव्या जागेवर कोणला संधी मिळतेय ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “शरद पवार राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले असते तर पारडे त्यांच्याकडे झुकले असते”
- “शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा
- “पुण्यातील शहराध्यक्ष पदाच्या बातम्या एप्रिल फुल सारख्या”; चंद्रकांत पाटलांनी दिला चर्चेला पुर्णविराम
- विखे पाटलांनी दिलेल्या ऑफरवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “आमचं मस्त चाललंय”
- “शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा