पुणे : अलिकडेच भाजपचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांना भाजपमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात पहाटेच्या शपथविधीची पुन्हा चर्चा सुरू झाली. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
“बारामती केंद्राला भेट द्याल तेव्हा विज्ञानाचे अनेक चमत्कार बघायला मिळतील”; शरद पवार
अजितदांदानी आमच्यासोबत यावं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम करावं. असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर राज्यातील राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेली ऑफर अजित पवारांनी धुडगावून लावली आहे. ते म्हणाले की, आमचं मस्त चाललंय असं म्हणत त्यांनी विखे पाटलांना हात जोडले.
राज्यसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, माणुस अनुभवातून धडा घेतो. राज्यसभेतून आम्ही धडा घेतला आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसेल. ज्याच्या बाजूने निकाल लागतो, त्याचं कौशल्य समजलं जातं. ज्यांचा पराभव होतो, ते कमी पडले असं समजलं जातं. त्यामुळे विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर कुणाकडे किती कौशल्य आहे आणि कुणाकडं नाही हे जनतेला कळेल, असंही ते म्हणाले.
“दोन लुटारू भाई भाई अवघा देश लुटून खाऊ”; शरद पवार, अदानी एकाच मंचावर, सदाभाऊंचा टोला
दरम्यान, विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जुन ला मतदान होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी सर्व आमदारांना एकाच हॉटेलमध्ये ठेवलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील 8 मत फुटल्याने भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत असं काही घडू नये म्हणून महाविकास आघाडी खुप काळजी घेत आहे.
Read also:
- “शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा
- “पवारसाहेबांमुळे पंतप्रधान पदावर 2024 ला मराठी नेतृत्व बसणार, मग तो पक्ष भाजप असो कि मविआ” दिपाली सय्यद
- केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला रोहित पवारांचा विरोध; अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना
- “आता भाजपला कोणत्याही निवडणुकीत जिंकणं अशक्य”; नाना पटोलेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
- अन् चक्क रोहित पवारांनी गौतम अदानीच्या गाडीचं सारथ्य केलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा